लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वांगसुंदर असा प्रसंग असतो. सध्या उन्हाच्या तडाख्यातही लगीनसराई किती धुमधडाक्यात सुरू आहे, हे आपण रोज अनुभवतो आहोत. किंबहुना लग्न म्हंटलं की, आधी आपण पोहोचतो ते फोटोग्राफर्सकडे. कारण फोटोग्राफर्सच्या नजरेतून आपण आपल्या लग्नाच्या आठवणी जपून ठेवत असतो. पण याच फोटोग्राफीच्या आडून कुणीतरी आपल्या लग्नात अचानक शिरतं, फॉटोग्राफरच्या टीममध्ये आहे सांगून आपल्या लग्नात आलेल्या मुलींचे संधी साधून फोटो काढत असतं आणि मग त्या फोटोचा वापर करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि सुरू होतो लव्ह जिहाद! होय थेट विषयावर हात घालतेय, कारण मी इथून पुढे तुम्हाला जे काही सांगणार आहे, ती निव्वळ मनोरंजन किंवा रंजकता निर्माण करणारी करणारी गोष्ट नाही. तर ती एक सत्य घटना आहे मागच्या १५ दिवसांत घडलेली!
केरला स्टोरी हा चित्रपट आपण बघितला. कित्येकांनी त्यावर प्रचंड टीका केली, banned करण्यासाठी प्रयत्न केले. असे चित्रपट मानसिकतेवर परिणाम करतात म्हणे. अर्थात ते आरोप करणारे हेच असावे ज्यांचे काळे धंदे केरला स्टोरी सारख्या चित्रपटांमुळं नजरकैदेत येतात. पण केरलाच काय, आपला महाराष्ट्र सुद्धा या सावटापासून सुरक्षित नाही याची साक्ष देतो वर्ध्यातील एका लग्नातील अतिप्रसंग!
अलीकडेच वर्धा जिल्ह्यात घडलेली एक घटना याचं ज्वलंत उदाहरण आहे. ही घटना ऐकून मन सुन्न होतं. एक फोटोग्राफर असल्याचं भासवून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने लग्नात आलेल्या तरुण मुलींचे फोटो काढले. या फोटोचा वापर करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होता – आणि यामागे होतं लव्ह जिहादचं मोठं जाळं.
विदर्भातील वर्धा हे शहर सर्वांनाच परिचयाचं आहे. कारण महात्मा गांधी यांनी आपला सेवाग्राम आश्रम इथे स्थापन केला. याच वर्ध्यातील एका हॉलमध्ये लग्नविधी सुरू होते. लग्न म्हंटलं की नटणं हे आलंच. त्यामुळं तरुण मुली नटून थटून फोटो काढण्यात गुंग होत्या.एकीकडं नेहमीप्रमाणे लग्नातील प्रत्येक क्षणाचे फोटो, आणि व्हिडिओ नवरदेव आणि नवरीकडच्या फोटोग्राफर्स टीम कडून काढणं सुरू होते. त्यात हॉल मध्ये एक व्यक्ती, नटून थटून आलेल्या मुलींचे फोटो काढत होता. अर्थात पूर्वीपपेक्षा आताच्या फोटोग्राफीची पद्धत खूप बदलली आहे.
फोटोग्राफीचे सुद्धा पॅकेज असतात, ज्यात नानाविध प्रकारचे व्हेरिऐशन्स असतात. मोबाईल रील, candid फोटोग्राफी. हे सगळं सहज Apple सारख्या चांगल्या मोबाइलवर होऊन जातं. त्यामुळं मुलींना वाटलं हा फोटोग्राफरच असावा म्हणून मुली देखील काढून घेत होत्या. तो फोटोग्राफरचा माणूस असेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्यानेही तसंच भासवलं. मात्र लग्नात एक महिला होती. मुलाची ती नातेवाईक आणि अत्यंत तल्लख बुद्धीची. हे असं वर्णन मी थेट त्या महिलेचं का केलं? कारण तिच्या हजरजबाबीपणामुळे खूप मोठं संकट टळलं. समोर बसलेली ती महिला कटाक्षानं त्या माणसाचं निरीक्षण करत होती.
तिला शंका आली की हा त्यांच्या पैकी दिसत नाही. कारण तो फोटो काढत तर होता पण लगेच बघत होता, अशा बऱ्याच विचित्र गोष्टी त्या महिलेला त्याच्या बॉडी language मधून निदर्शनात आल्या. विशेष म्हणजे तो केवळ तरुण मुलींचेच फोटो काढत होता. हे तिच्या लक्षात आलं.तो माणूस अचानक वॉशरूमच्या दिशेने गेला. प्रसंगावधान राखून त्या महिलेनं आपल्या पतीला त्या माणसाच्या मागे नजर ठेवण्यास पाठवलं. तेव्हा तिथे त्यांच्या निदर्शनात आलं की हा हे फोटो कोणाला तरी पाठवत आहे. जे आवडले नाही ते तो तिथेच डिलिट करून टाकत होता. त्या महिलेच्या पतीने त्याची चौकशी केली तेव्हा तो बिथरला. उडवाउडवीचे उत्तरं देऊ लागला. त्यांनी लगेच त्याला खेचत हॉल मध्ये आणलं. अर्थात लग्नाचा हॉल म्हंटल्यावर तिथे चांगलीच गर्दी जमा झाली.त्या गर्दीत त्याला त्या महिलनं विचारलं. कोण तू? कोठून आलास? आणि मुलींचेच फोटो का काढत होता? तेव्हा त्याने मी कंपनीतून आलो असं सांगितलं. कदाचित नवऱ्या मुलाच्या कंपनीतला असू शकतो म्हणून त्याला विचारलं तर त्याने नकार दिला.मुलीनेही सांगितलं मी याला ओळखत नाही. फोटोग्राफर्सला विचारलं तर दोन्हीकडच्या फोटोग्राफर्सनी हा आमच्यातला नाही असं स्पष्ट सांगितलं. त्याने ज्या कंपनीचं कार्ड दिलं तिथे फोन केला तर “हा माणूस आमच्याकडे तीन वर्षांपूर्वी कामाला होता” असं त्यांनी सांगितल्यानंतर तो पुरता अडकला. त्या महिलेने त्याचा फोन हिसकावून घेत धाक दाखवत त्याचा पासवर्ड त्याच्याकडून घेतला, तर अनेक धक्कादायक खुलासे झाले. आधी गॅलरीमध्ये फोटोच नव्हते. त्याने लगेच डिलिट करून टाकले होते. मात्र महिलेनं recycle bin open केल्यानंतर तिला सगळे फोटो दिसले.
ते फोटो बघून सगळ्याच उपस्थितीतांचा संताप झाला आणि मुलीदेखील बिथरल्या. त्याला “तू या फोटोचं काय करतो?” ते सांग असं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तो असाच लग्नांमध्ये जातो आणि फोटो काढतो. त्याच्या कॅमेऱ्यात आदल्या दिवशीच्याही कोणत्यातरी लग्नात जाऊन काढलेले मुलींचे देखील फोटो होते. शिवाय अर्ध्या तासांपूर्वीच्या एका शेजारच्याच लग्नातील देखील फोटो होते. तिथे कोणीही त्याला हरकत घेतली नव्हती. महिलेनं त्याच्याकडून जेव्हा त्याचं व्हॉट्सऍप उघडून घेतलं तेव्हाचा प्रसंग अगदी थरकाप उडविणारा होता. त्याने हे फोटो एका ग्रुपला पाठवलेले होते आणि त्यातली
chat अशी : “इसमे से आपको कौनसी सेकंड marriage के लिए अच्छी लगती है? मेरे ख्याल से ये अच्छी है! ये इस इन्स्टिट्यूट में है!”
सगळेच अगदी सुन्न झाले. मुलींची एवढी इन्फॉर्मेशन याला कुठून मिळाली? हा लग्नात जावून ओळखू कसा येत नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले. ज्यावेळी त्या महिलेनं त्या माणसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड चेक केलं तेव्हा स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा तो मुसलमान असल्याचं समोर आलं. लोकांचा राग अनावर झाला. त्याला थोडीफार मारहाण झाली. कायदा हातात घ्यायचा नव्हता म्हणून वेळीच सगळे सावध झाले. त्याने चक्कर येण्याचं नाटक केलं. तेवढ्यात पोलीस आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्यानं स्वतः सांगितलं की तो लव्ह जिहादी आहे! तो अशाच चांगल्या मुलींना घेरतो आणि फोटो पाठवतो. पुढे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांचं धर्मांतर करून लग्न केलं जातं. म्हणजे आपण किती सावध राहायला हवं आहे हे यातून लक्षात घ्या. हे असं सगळं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होतं हे जरा लक्षात घ्या. कारण होतं काय की, एकीकडे तो माणूस मुलींचे फोटो काढत असतो. त्यामुळं मुली "आपले फोटो मला पाठवा" म्हणून सर्रास त्या अनोळखी माणसाला नंबर देतात आणि पुढे चालून हाच माणूस त्यांना या फोटोरून blackmail करतो.
हे खरंच खूप मोठं षडयंत्र आहे. आज ज्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्या महिलेनं, धाडसानं या सगळ्या गोष्टी समोर आणून त्या लव्ह जिहाद्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणून खूप मोठं संकट टळलं असलं, तरी हे लव्ह जिहादी सावट सगळीकडे दबा धरून बसलंय. असे 'अब्दुल' कुणाच्याही लग्नात येऊ शकतात. त्यामुळं लग्नाला जाताना, लग्नात आणि ज्यांच्या घरचं कार्य आहे त्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. फक्त लग्नच नाही तर सगळेच कार्यक्रम या सावटाखाली आहेत. त्यामुळं सतर्क रहा.
एकंदरीतच, हसत-खेळत साजरे होणारे लग्न हे आपल्या आयुष्यातला सुंदर क्षण असतो, पण आजच्या काळात त्या क्षणातही सावध राहणं तितकंच आवश्यक झालंय. या घटनेनं आपल्याला एकच धडा दिला आहे – डोळे उघडे ठेवा, विचारपूस करा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेऊ नका. पण एक प्रश्न पडलाच पाहिजे, तुमच्या लग्नातही असा कुणी अनोळखी माणूस घुसला, आणि तो फोटोग्राफर असल्याचा दावा करू लागला, तर तुम्ही ओळखू शकाल का?
तुमच्या घरातील महिलांची, मुलींची अशी माहिती कुणा अनोळखीच्या मोबाईलमध्ये जात असेल तर तुम्हाला ते समजेल का? किती वेळा आपण केवळ 'पॅकेजचा भाग असेल' म्हणून विचार न करता फोटोज काढून घेतो? हा निष्काळजीपणा उद्या कोणत्या संकटात बदलेल, हे सांगता येईल का? आज त्या एका धाडसी महिलेमुळे मोठं संकट टळलं. अशी सतर्कता प्रत्येक महिलेमध्ये हवी.
म्हणूनच उद्या तुमच्या किंवा आपल्या कुणाच्या घरात असं काही होऊ नये, यासाठी आपणच सजग राहायला हवं. हा प्रसंग आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो – डोळे उघडे ठेवा, विचारपूस करा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जागरूकता आणि सजगता हाच आपला सर्वोत्तम बचाव आहे.
तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेन्टमध्ये जरूर शेअर करा.
https://viewprachi.blogspot.com/2021/03/blog-post.html
🖋 प्राची नाईक उंडणगावकर🖋